|| श्री राम समर्थ ||
महाराष्ट्रातील नांदेड जिल्ह्यात देगलूर म्हणून एक प्रसिद्ध गाव आहे. येथील धुंडा महाराज देगलूरकर एक प्रसिद्ध धर्मपरायण, हरिपरायण व्यक्तिमत्व होऊन गेले आहे. त्याच्या भक्तिपरायणाने त्यांच्या पूर्ण वंशच हरिभक्तीला वाहिलेला आहे. हा एक वंशपरंपरागत चाललेल्या भक्तीचे. एक आदर्श उदाहरण म्हणायला पाहिजे. तसे देगलूर हे संपूर्ण गावच भक्ति मार्गाकडे आकर्षित असल्याचे दिसून येते. नांदेड जिल्ह्यापासून ८० मैल दक्षिणेकडे, किंवा हैद्राबादपासून जवळपास २०० किमी. वर हे गाव आहे. या देगलूर गावात पत्कींचा वाडा फार जुना असून लोक बाहेरगावच्या पाहुण्यांना हा वाडा म्हणजे एक प्राचीन ऐतिहासिक वास्तू म्हणून दाखवित असतात. देगलूर शहराच्या मध्यभागी श्रीरामचंद्राचे व श्रीविठ्ठलाचे अशी दोन मंदिरे आहेत. अर्थातच ही देगलूरकर वासियांची श्रद्धास्थाने, नित्य दर्शन, उपासनेची स्थाने आहेत. त्यामुळे येथील लोक श्रीरामाचे किंवा श्रीविठ्ठलाचे भक्त निपजतील यात शंका नाही. श्रीधुंडा महाराज देगलूरकर हे वारकरी संप्रदायाचे तर श्रीधरस्वामी हे रामदासी संप्रदायाचे होते.
हे दोघेही मूळचे देगलूर गावचे राहणारे होते. नारायणराव व गोविंदराव देगलूरकर हे दोघे सख्खे भाऊ पुढे काकांच्या त्रासानी हैद्राबादला येऊन स्थाईक झालेत. यांचे वास्तव्य पत्कींच्या जुन्या वाड्यातच असावे. आडनावाचा उल्लेख कोणीही लेखकानी अधिकाराने केलेला नाही. यांच्या वडिलांचे नाव तिरमाजी व आजोबांचे नाव शिरमाजी असल्याचा उल्लेख चरित्र लेखक श्री. मारुतीबुवा रामदासी यांनी त्यांच्या पुस्तकात केला आहे. श्रीधरस्वामींच्या कुळात अपत्यांचा अभाव होता. त्यांना वाडवडिलांकडून वैभव, ऐश्वर्य मिळाले होते. पण ते टिकले नाही असेच म्हणावे लागेल. त्यांच्या घराण्याला नागाचा शाप असल्याचे सांगितले जाते. त्यांच्या पत्की वाड्याच्या घरात एक मोठा नाग निघाल्याचे सांगतात. त्याला मारण्याकरिता वाड्यातील मंडळी लाठी, काठ्या बंदुका घेऊन जमा नमः शांताय दिव्याय सत्यधर्मस्वरूपिणे ।
झाली होती. नाग फणा काढून डुलत होता. सर्वत्र लोकांकडे पाहत होता. काहींनी तो घराण्याचा रक्षक आहे. निघून जाईल मारू नका असे सांगितले तर काहींनी. हा नाग हा विषारी आहे. कोणाला चावला तर मृत्यू येईल. शिवाय घरात नाग असताना राहायचे कसे ? भीतीनेच माणूस अर्धमेला होईल. शेवटी त्यांच्या घराण्यातील कोणी तरी बंदुकीची गोळी चालवून- नागाला जागीच ठार मारले. पण काही दिवसांनी श्रीधरस्वामींच्या घराण्यातील पूर्वजांच्या स्वप्नात एका तेजस्वी पुरुषाने येऊन सांगितले की मी तुमच्या घराण्यातील कर्ता पुरुष, रक्षक होतो. तुम्ही मला ठार मारलेत. त्याचा शाप म्हणजे तुमचे घराणे निर्वंश होईल. हे ऐकून तो पूर्वज स्वप्नातच कासावीस झाला. घराणे तर वाचवायला पाहिजे. म्हणून त्या तेज:पुंज पुरुषाची प्रार्थना करू लागला की एवढी मोठी शिक्षा संपूर्ण घराण्याला देऊ नका. ज्यानी वध केला त्याला द्या. इतरांना त्या ब्रह्महत्येचे पाप कशाला देता. तेव्हा त्याची प्रार्थना ऐकून त्या तेज:पुंज पुरुषाने उःशाप दिला की या कुळाला उद्धरणारा एक संन्यासी जन्माला येईल. तुमच्या संपूर्ण कुळाचा उद्धार होईल पण वंश खुंटेल. अशी शापवाणी व उःशाप देऊन तो पुरुष अदृश्य झाला.
ही घटना श्रीधरस्वामींच्या घराण्यात घडलेली आहे असा उल्लेख अनेक चरित्रलेखनकर्त्यांनी केला आहे. कर्माची गति किती गहन असते. आपल्याला त्याचे आकलन येत नाही. श्रीशंकराचार्य म्हणतात कर्म करून कोट्यानुकोटी वर्षे झाली तरी त्याचे फळ हे भोगावेच लागते. ते कोणत्या जन्मात, कोणत्या योनीत भोगावे लागेल हे मात्र सांगता येत नाही. रामायणातील कथा घेतली तर तुम्हाला माहित आहे की दशरथ राजाकडून नकळत श्रावणबाळाला बाण लागून मृत्यू आला होता. त्याच्या आईवडिलांनी राजा दशरथाला शाप दिला होता की तू देखील पुत्रविरहाच्या दुःखाने विव्हळ होऊन मृत्युमुखी पडशील. तेव्हा दशरथाला मूलबाळ नव्हते. त्याने पुत्रकामेष्टी यज्ञ केला. त्यानंतर त्याला चार पुत्र प्राप्त झाले. रामाला वनवासात पाठविताना त्याला अपार दुःख झाले व त्याला मृत्यू आला. येथे दशरथाचे संचित कर्माची फळे त्याला पुत्रप्राप्तीनंतर भोगावी लागली. तसेच श्रीधरस्वामींच्या कुळातील घडलेल्या घटनेची, दुष्कर्माची फळे त्यापुढील वंशावळीला भोगावी लागली.
नारायण व गोविंद यांचे बालपण त्याच्या काकाकडे गेले. कारण ही मुले अल्पवयात असताना मातापित्याचे छत्र उडून गेले होते. त्याचे काका खूपच खाष्ट, तामसी वृत्तीचे असल्याने त्यांनी पुतण्याचा सांभाळ, योग्य प्रकारे केला नाही. त्यांना शिक्षण पण दिले नाही. उलट लोकांसमोर ही कारटी/कधी तोंड काळी करतील हे सांगता येत नाही. नुसती. घोड्यासारखी वाढत आहेत. अशी टीका, तीक्ष्ण वाक्ये बोलून ते पुतण्यांची निर्भत्सना करायचे. अशा घरात काय रहायचे? या विचारांनी दोन्ही भाऊ देगलूरहून निघून हैद्राबादेत आलेत. तेथेही त्यांना दुःखाची झळ सोसावी लागली. मोठ्या प्रयत्नांनी एका श्रीमंत व्यक्तीची प्रार्थना करून त्यांनी नोकरी मिळविली. नोकरी म्हणजे कष्टाची कामे दिवसभर करायची दोन वेळ जेवून रात्री पडायचे. घर सोडले, गाव सोडले तरी दारीद्र्य काही कमी झाले नाही. काळाची प्रतिकूलता, अनुकूलता यावरच प्रारब्ध भोगावे लागते. हा काळ म्हणजे परमात्म्याचे दुसरे रूप आहे. एक सर्व विश्वाचे लालन पालन पोषण करणारी विष्णूची मूर्ती आणि काळाचा प्रताप दाखविणारी प्रलयाची भयावह मूर्ती. हेच विश्वरूप ज्ञानदेव माऊलीने अध्याय १० मध्ये वर्णन केले आहे. १०.१५ ते १०.२२ मध्ये विश्वरूप सुखावह, आनंददायी आहे. तर १०.२३ ते ३० मध्ये संहार करणारे काळभैरवाचे रूप आहे. परब्रह्माची ही दोन्ही रूपे पाहावीत त्यानंतर संपूर्ण ब्रह्माचे रूप दर्शन होते.
दोन्ही भावांची शिक्षणाची आवड पाहून त्या श्रीमंत गृहस्थाने त्यांचे शिक्षण पूर्ण केले. थोडे सुखाचे दिवस पाहता न पाहता तोच दोघांच्या बायका एकामागे एक इहलोक सोडून गेल्या. पुन्हा दुःखाची लाट जीवननौकेवर आदळू लागली. त्यांनी दुसरे लग्न करून पुन्हा संसार करायचे ठरविले. गोविंदरावांना पहिल्या व दुसऱ्या पत्नीकडून अपत्य नव्हते. नारायणरावांना पहिल्या पत्नीपासून एक मुलगी s रेणुका (गोदावरी) होती. व दुसरी पासून गोविंद हे दोन मुलगे. त्यातील गोविंदाने मृत्यू गाठला. त्यामुळे घरावर काही सावट, अरिष्ट दाखवून असल्याचे नारायणरावांच्या पत्नीला वाटायला लागले, तिला पुन्हा पुन्हा नागाच्या शापाची भीती वाटायची. ब्राह्मणाला, उपाध्यायांना भेटून जन्मपत्रिका काही तोडगा निघतो का ? असे कमळाबाईंनी ठरविले. पत्रिकेनुसार तुम्हाला गाणगापूरला जावे लागेल. तेथे नारायणराव व कमळाबाईनी तप, व्रत करावीत. श्रीगुरु नृसिंहसरस्वतींच्या कृपेने तुम्हाला एक दिव्य रत्न प्राप्त होईल. हा ब्रह्मसंन्यासी तुमच्या घराण्याला असलेल्या शापाचे उच्चाटन करून पुन्हा नाव लौकिक वाढवेल. अशी भविष्यवाणी ऐकून नारायण व कमळाबाईने. हैद्राबादहून गाणगापूर गाठले. लवकरच गाणगापूरला आल्यावर नारायणराव व कमळाबाईनी मोठ्या श्रद्धेने व निष्ठेने श्रीगुरुचरित्र पारायण सुरू केले. ती रात्रंदिवस गुरुसेवा व पतिसेवेत रमून जाई. तिला स्वतःचे देहभान पण राहत नव्हते. श्रीदत्तात्रेयांनी तिची भक्ती पाहून प्रसन्न होऊन प्रसाद म्हणून एक श्रीफळ दिले. पतिपत्नीनी तो प्रसाद ग्रहण केला. त्यानंतर कमळाबाईंना दिवस गेले. मुलीच्या बाळंतपणासाठी आई बयाबाई, चिंचोलीला येऊन राहिली. चिंचोलीला कमळाबाईची एक मानलेली बहीण होती. पण संबंध घरोब्याचे होते. बाळंतपण चिंचोलीला करायचे ठरले. चिंचोली हे गाव गाणगापूर पासून दहाबार किमीवर आहे. चिंचोलीचे ग्रामस्थ दत्तात्रेयाला ग्रामदैवत मानून दत्तजयंती साजरी करायची. अशाच एका दत्तजयंतीला कमळाबाईंनी श्रीधर बाळाला जन्म दिला. श्रीधर स्वामींचा जन्म सन १९०८ दत्तजयंतीच्या दिवशीचा. जन्मस्थळ लाडचिंचोली. दत्तकृपेने पुत्रलाभ झाला हे पाहून सर्वांनाच अतिशय आनंद झाला. कमळाबाईचा आनंद तर गगनात मावेनासा होता. त्यावेळेस थोरल्या भाऊ अंबकचे वय बारा वर्षाचे तर रेणुका (गोदावरीचे) वय २५-२६ वर्ष वयाचे होते. त्यावेळेस गोदावरीचे लग्न होऊन ती सासरी गेली. श्रीधरस्वामींच्या जन्मानंतर त्याचे वडिल नारायणरावांचे निधन झाले. त्यांचे वय पन्नाशीच्या जवळपास असावे. पतिदेवाचे निधन हा एक मोठा घातच कमळाबाईवर होता. पण श्रीधरबाळाला मोठे करायचे आहे ही जबाबदारी त्यांचेवर होती. श्रीधरबाळाचे गोड हास्य पाहून ती दुःख विसरून जबाबदारीने वागत असे. श्रीधरला हैद्राबादच्या विवेकवर्धिनी शाळेत घातले. तो हुशार, एकपाठी असल्याने तो पहिला नंबर सहजच पटकावयचा. आई त्याला रामायणातील कथा गोष्टी सांगायची. हनुमानाने रामनाम घेऊन किती असाध्य कामे साध्य केली. हे ऐकून श्रीधरस्वामींची श्रद्धा रामनामावर दृढ होत गेली. त्यांना रामनामाची गोडी लागली. त्या गावात नारायणमहाराजांचा मठ होता. श्रीधर आईबरोबर नेहमी मठात जाई. तेथे श्रीसमर्थ रामदास स्वामींचे मोठे तैलचित्र होते. त्या चित्रासमोर श्रीधर तासन्तास उभा राहून रामनाम म्हणत राहायचा. हा दृश्याचा प्रभाव आहे. फोटोतून सद्गुरु कशी कृपा करतात ती कृपा श्रीधरस्वामींवर बालपणातच झाली. तेथे खैरताबादचा केसरी मारुती होता. जवळपास ७-८ किमी दूर होता. श्रीधर स्वामी रोज मारूती दर्शनाला जाऊन परत येत. हे मारूतीचे देऊळ हैद्राबादच्या पंचक्रोशीत प्रसिद्ध होते. कमळाबाईंनी श्रीधराचा मौज गाणगापूरला केली. औदुंबरच्या वृक्षाखाली त्यांना श्रीदत्ताचा वैराग्याचा आशिर्वाद लाभला. श्रीधर स्वामी अवघे दहावर्षाचे असताना त्याचा भाऊ अंबक काळाने हिरावून नेला. त्यानंतर गोदुअक्का ही गेली. अशा दुखद प्रसंगी श्रीधरबाळाने आईला खूप सावरले. आई तू का रडतेस ? आपला देह पंचमहाभूतांचा बनलेला आहे. पण त्यात राहणारा आत्मा हा अजन्म, अमर आहे. नाशिवंत देहासाठी दुःख शोक व्यक्त करू नये. हे लहानपणाचे शब्द म्हणजे गीतेतील श्रीकृष्णाने अर्जुनाला जसे समजाविले होते. तसेच समजाविण्यासारखे आहे. इतक्या लहान वयात ज्ञान होणे हे त्यांचे साधुसंतांचे लक्षण दाखविते. त्यानंतर कमळाबाईंची हिम्मत खचल्यासारखी झाली. मुलगा- मुलगी मोठी कर्तीसवरती निघून गेल्यानी त्या खचत चालल्या होत्या. त्यांना बोलताना दम लागत होता. • श्रीधर बाळाला शेवटचा उपदेश दिला की सर्व स्त्रियांना तू मातेसमान मान, समाजाची, गुरुजनांची सेवाकर, स्त्रीजनांची सेवा करून त्यांचा उद्धार कर. सर्वांना समदृष्टीने पाहा. भेदभाव करू नकोस. बोलताना त्या मधेमधे थांबत होत्या. श्रीधरस्वामींच्या पाठीवरून हात फिरवला. मी सांगितलेले पाळ. अवज्ञा करू नकोस. असे म्हणून त्या शांत झाल्या. आईचे निधन वाल्यावर श्रीधर पोरका झाला.जवळचे आप्तेष्ट म्हणून कोणी उरलेच नव्हते. श्रीधरांनी काही दिवस त्याचा भाचा म्हणजे रेणुकेचा मुलगा दत्तात्रय कमलापुरकर यांचेकडे चिंचोळीलाच काढले. चुलत काकी त्रिवेणीबाईकडेही त्यांनी काही दिवस काढले. मावशीने श्रीधरला गुलबर्ग्याला बोलावून घेतले. हैद्राबादचे घर सोडून, सामान जोरगरिबांना वाटून फक्त मोजकेच सामान घेऊन श्रीधर स्वामी गुलबर्ग्याला गेले. तेथे त्यांना काही विद्वान लोकांची प्रवचने ऐकायला मिळाती, त्यात पुण्याचे अग्निहोत्री राजवाडे, ह.भ.प. ल. रा. पांगारकर, नारायणशास्त्री मराठे व ब्रह्मीभूत केवलानंद सरस्वती ही मंडळी सामील होती. हा एक प्रकारे सत्संगव घडत होता. श्रीधरांचे मन अध्यात्मशास्त्राकडे वळत होते. पण गुलबऱ्यात राहून प्रगती होणार नाही म्हणून त्यांच्या मनात पुण्याला जायचा विचार आला. पुण्यात शिकताही येईल व आपल्याला पाहिजे ती संगत पण मिळेल. पण पुण्यात राहायचे कोठे ? हा मोठा प्रश्न होता. गुलबर्म्यातील श्री. चितळे यांनी त्यांचा प्रश्न सोडविला. त्यानी एक चिठ्ठी कै. वि. रा. केतकर संचालक व संस्थापक पुणे अनाथ विद्यार्थीगृह यांना लिहून श्रीधराला त्यांना भेटायला सांगितले. ती चिठ्ठी घेऊन श्रीधर पुण्यात आले. अनाथ विद्यार्थी गृहात राहिले. तेथील काही वाटून दिलेली कामे करायची, आजारी लोकांची सेवा करायची, फावल्या वेळात अभ्यास, व्यायाम करायचा. सर्वांशी प्रेमळ संबंध ठेवल्याने ते सर्वांचेच आवडते होते. पुढे विद्यार्थीगृह सोडून नरसोबाच्या देवळात रहायला लागले. भावे स्कूल मध्ये इयत्ता सहावीत प्रवेश घेतला. वडिलांनी दिलेली ठेवीवर ते व्याज घेऊन खर्च चालवित. भिक्षा मागूनच ते उदरनिर्वाह करीत. अंगी वैराय बाणण्याकरिता त्यांनी गोड खाणे सोडले. त्यांना पेढे फार आवडायचे. पण त्याचा त्याग करून जिव्हेवर ताबा मिळविला. पैशाचा मोह नको म्हणून ते पैसे फेकून देत. जीवनाचे ध्येय सात्विक व उंच असावे. या उद्देशांनी त्यांनी तप, तपश्चर्या करायचे ठरविले. ते गोमेय- मृत्तिकास्नान त्रिकाळ करीत असत. त्यांची गाठ एकदा श्री. वा. दा. पळणीटकर यांचेशी पडली. श्री. पळणीटकर हे ब्रह्मचारी असून, सरळ स्वभावाचे, धर्मपरायण होते. त्यांनी श्रीधरमधील सत्वगुणी व्यक्तिमत्व व परमेश्वराचा ध्यास लागल्याचे ओळखले. श्रीधरच्या खोलीवर जाऊन त्यांनी सखोल चर्चा केली. रघुवीर समर्थ मनात काय आहे हे जाणून घेतले. तपासाठी सज्जनगड हे योग्य ठिकाण असल्याचे सांगितले. शिवाय तेथे श्रीसमर्थ रामदासस्वामींची समाधी आहे. त्याशिवाय उत्कृष्ट ठिकाण दुसरे नाही. त्यांनी श्रीधराला काही दिवस आपल्या खोलीत राहावयास बोलाविले. तेथे नित्य सायंकाळी श्रीमत् दासबोधाचे पठण होत असे. श्री. पळणीटकरांना पत्रिका पाहून, हस्तरेखापाहून भविष्य सांगण्याचा नाद होता. त्यांनी श्रीधरचा हात पाहून त्याचेकडून मोठे कार्य होणार आहे हे ताडले होते. सज्जनगडावर जाऊन तपश्चर्या करण्याचा सल्लाही याकारणामुळे दिला होता. सद्गुरु जरी नसले तरी त्यांचा फोटो समोर ठेवून पूजा करून त्यांच्या मंत्राचा अनुग्रह घ्यावा. त्याप्रमाणे श्रीधरने समर्थ रामदासांचा फोटो समोर ठेवून पूजा करून, त्रयोदशीमंत्राचा तीनदा उच्चार करून फोटो कानाला लावला. त्यादिवसापासून श्रीरामदासस्वामी त्यांचे सद्गुरु झाले. सद्गुरु कानमंत्र देऊन दिक्षा अनुग्रह देतात पण सद्गुरु हयात नसल्याने असा अनुग्रह फोटो समोर ठेवून घ्यावा. दासबोध पथक्रम सारामध्ये सद्गुरु पादुका पूजन करून चरणोदक घेऊन, अनुग्रह घ्यावा असे म्हटले आहे. त्यानंतर श्रीधर सज्जनगडावर जायला निघाले. पळणीटकरांनी त्यांना एक रुपया दिला. आशीर्वाद देऊन नावलौकिक मिळवा असे म्हटले.
श्रीधर स्वामी पुण्याहून सातारा-सज्जनगडकडे पायीच जायला निघाले. पहिला मुक्काम त्यांनी बनेश्वरला केला. जवळपास २०-२१ किमी चालल्यावर रात्र झाली, थांबणे आवश्यक होते. रस्ता कच्चा खडबडीत असल्याने ठेचा लागणे स्वाभाविकच होते. बनेश्वर हे शिवाचे जुने प्राचीन देवस्थान आहे. निसर्ग परिसर रम्य आहे. सकाळी उठून देवळात जाऊन दर्शन घेतले. तेथे गावात जाऊन माधुकरी मागितली. विजयादशमी असल्याने गावातील लोक दर्शनास येत होते. मंदिरात जप झाल्यावर भोजन करून दुपारी पुन्हा सज्जनगडकडे जावयास निघाले. तिसऱ्या दिवशी स्वामी सायंकाळी सातारा येथील पवई नाक्यावर येऊन पोहोचले. तेथे विश्राम करून अजिंक्यताराचा बोगदा ओलांडून गडाच्या रस्त्यावर त्यांची पावले झपाझप चालत होती. मुखाने श्रीरामाचा जप सुरू होताच. गडावर चढताना पहिली कमान, दुसरी कमान पार करून जात होते.
निनादात ते समाधी स्थळा पाहाचल. उजव्या बाजूल समाधी स्थान व डाव्या बाजूला त्यांचे शेजघर होते. ४-५ पायऱ्यावरून खाली उतरून समाधीजवळ येऊन बसले. डोळ्यातून अश्रुधारा वाहात होत्या. वाणी के झाली होती. ‘मना उन्मनी शब्द कुंठील कुंठीत राहे। तो गे जो राम सर्वत्र पाहे।’ श्रीधरस्वामी स्वतःचे भान विसरुन गेले होते. समाधीला साष्टांग नमस्कार केला. त्रयोदशी मंत्राची एक माळ त्यांनी समाधीला अर्पण केली. नंतर वर असलेल्या श्रीरामाचे दर्शन घेतले. गडावरच्या व्यवस्थापकांनी त्यांना जेवणासंबंधी विचारून भोजनाचा प्रसाद दिला. इ.स. १९४७ साली संस्थानचा कारभार श्री. मंत्री बघायचे. काही वेतन न घेता ते निःस्वार्थ, नि:स्पृह वृत्तीने गडावरची व्यवस्था पाहायचे. त्याकाळी गडावर तीन दिवसाचे वर कोणालाही राहू देत नव्हते. श्रीधरांना गडावरचे नियम, नित्यनेम कार्यक्रम याबद्दल काहीच माहिती नव्हती. ‘तुम्ही किती दिवस राहणार ?’ एका कारभाऱ्यानी त्यांना विचारले. प्रश्न ऐकून श्रीधरांना थोडे आश्चर्यच वाटले. ते तर तपश्चर्याच करायला आले होते. त्यांनी ‘मी तर कायमचाच राहायला आलो आहे.’ हे उत्तर दिले. ते शक्य नाही. तुमचा राहण्याचा उद्देश समजल्याशिवाय व व्यवस्थापकांची परवानगी घेतल्याशिवाय राहता येणार नाही. व्यवस्थापकांना भेटून, चर्चा झाल्यावर असे. ठरले की तुम्हाला येथे सेवा द्यावी लागेल. मठातील नित्यनेमाची कामे करावी लागतील, इत्यादी इत्यादी. श्रीधरबुवा सर्व करायला तयार झाले. शेवटी समर्थांचीच सेवा घडणार आहे या आनंदात ते होते. सज्जनगडावर इ.स. १९२७ अश्विनी पौर्णिमेपासून ते १९३० च्या माध वद्य नवमीपर्यंत श्रीधरबुवा तेथे राहिले. गडावरच्या वातावरणात राहिल्याने त्यांच्या नित्यनैमित्तिक कार्यात फरक पडला. पहाटे उठून स्नानसंध्या आटोपून, पूजा अर्चा करून जपाला बसायचे. नंतर स्वयंपाक खोलीत जाऊन काही हातभार लावायचा. नैवेद्य तयार करून देवाला दाखवायचा. लोकांना प्रसाद देण्याचे, वाढण्याचे काम ते करायचे. श्रीराममंदिराचा गाभारा, समर्थांची समाधीची जागा, शेजघर झाडून, धुवून काढण्याचे काम त्यांनी रोजच्या करिता स्वत:कडे ठेवले, समाधीची वस्त्रे धुवून वाळत टाकणे, देवपूजेची भांडी, तांबे, लोटी, गड्डू, इत्यादी धुवून स्वच्छ करणे. तेथील पुष्पवाटिकेला पाणी घालून फुले वेचणे, माळा तयार करणे. तळशीपत्र, मंजिऱ्या वेचणे इत्यादी बारीक सारीक कामे ते स्वतः करायचे. समाधीला गंधाचा लेप बराचसा लागायचा. ते गंध उगाळून ठेवायचे. समर्थांच्या पलंगावरचे वस्त्र, चादरी धुवून स्वच्छ करून बदलणे अशा अनेक कामात त्यांचा वेळ जायचा. दुपारी, सायंकाळी भजन, कीर्तन, सवाया, दासबोध, मनोबोध इत्यादी ग्रंथांचे आळीपाळीने पठण करायचे. त्यावेळेस सोनतळ्याहून पाणी आणावे लागत असे. रोज ४०-४५ घागरी लागायच्या. या कामात देखील श्रीधरबुवांनी तत्परता दाखविली. त्यावेळी अंदाजे रोज २५-३० माणसे जेवायची. इतकी नित्यनेमाची कामे करून देखील श्रीधरस्वामी कधी थकले नाही की कामाचा अहंकार जडला नाही. कोणत्याही कामाला कधी नाही म्हटले नाही. गडावरचे उत्सव, रामनवमी, हनुमानजयंती इतर सणासुदीला काम वाढायचे. गावातील लोक दर्शनाला यायचे. पण त्यावेळी श्रीधरस्वामींना एक आगळा वेगळा उत्साह व स्फूर्ति यायची. एकदा व्यवस्थापक श्री. मंत्री यांना काही महत्त्वाच्या कामाकरिता बाहेर गावी जायचे होते. प्रश्न असा पडला की गडावरची कामाची देखरेख को करणार ? तो प्रश्न श्रीधरबुवानी सोडविला. तुम्ही निश्चिंतपणे जा. मी येथेच आहे. काळजी करण्याचे कारण नाही. आणि श्रीधरस्वामीनी त्यांची उणीव भरून काढली. त्यांच्या या प्रेमळ स्वभावाने व दुसऱ्याला त्रास न होऊ देता, कोणाला दुःख न दिल्यामुळे ते सर्वांचेच आवडते झाले होते. गडावर आलेल्या साधुसंतांची, वयोवृद्ध व्यक्तीची ते सेवा करीत. त्यांना कशाचीही कमी ते पडू देत नसत. श्रीधरबुवाचा वर दिलेला नित्यक्रम एक दीड वर्षे चालला. पण काही सेवेकऱ्यांना त्याचा हेवा वाटायला लागला. श्रीधरांचे प्रस्थ वाढतच चालले होते. त्यात मर अशी पडली. दोन फौजधारी गडावर नियुक्त झाले. त्यांची पाहण्याची नजर म्हणजे समोरचा चोर, लबाड, लुच्च्या असायला पाहिजे. या भावाने ते पाहत आणि इतरांशी बोलत असत. श्रीधरांबरोबर त्यांचे वागणे असेच. ढोंगी बाबा आहे. सर्व काही माहित असल्याचे ढोंग . तू काय स्वतःला समर्थ समजतो का ? हा करतो. कोणाशी नीट बोलत नाही अशा पद्धतीचे विष त्यांनी गडावरच्या लोकांच्या मनात कालवायला सुरु केली. त्यांना साथ एक स्वयंपाकी बाई व एक पाखंडी नारणमा श्रीधर स्वामींची ‘कागळी’ ‘लावालावी’, चुगलखोरी व्यवस्थापकाकडे नेली. त्यांनी सुरुवातीला कानाडोळा केला. पण ही रोजची तक्रार होऊन बसली. श्रीधरबुवा गुरुद्रोही आहेत. येथे विनाकारण सेवेचे निमित्त सांगून, फुकटात दिवस काढत आहे. एके रात्री श्रीधरस्वामी जप करीत असताना जारण-मारण मंत्रधारी साधूने यक्षिणीला बोलावून श्रीधरांच्या अंगावर सोडली, रामनामाच्या जप करणान्याला कोणतीही भूत प्रेत बाधा त्रास देत नाही. हे सर्वांना माहित आहे व सर्वाची याबद्दल खात्री पण आहे. त्या यक्षिणीने श्रीधरबुवांना तर त्रास दिला नाही पण ती उलटी त्या पाखंडी साधुवरच चालून गेली. त्यामुळे तो पाखंडी साधू मी चुकलो! मला वाचवा 11 मला क्षमा करा. पुढे कधी असे करणार नाही असे बडबडत लोळायला लागला. सर्वजण जागे झाले. त्या साधूने आपली चूक कबुल केली. तो श्रीधर स्वामींच्या पाया पडला. ही घटना दुसऱ्या दिवशी व्यव्थापकांना द अधिपती श्री. बापूसाहेबांना कळली. त्यांनी या चारही जणांना कामावरून काढून टाकले. श्रीधर स्वामींच्या मार्गातील बाधा दूर झाली. असा समर्थ सेवेचा आदर्श श्रीधर स्वामींनी त्यांच्या गडावरच्या वास्तव्यात घडवून आणला. एके दिवशी सकाळी ब्राह्मीमुहूर्तावर श्रीधर स्वामी समाधीकडे जाणाऱ्या भुयारात ध्यानस्थ बसून जप करत होते. एकाएकी भुयारात लख्ख प्रकाश पडला. त्या दिव्य प्रकाशाने चारी दिशा उजळून निघाल्या होत्या. आपण कोठे आलो आहे. हे स्वामींना कळत नव्हते. त्या तेजोमय प्रकाशातून एक तेज:पुंज मूर्ति बाहेर आली. ते समर्थच असल्याचे जाणून श्रीधरबुवांनी साष्टांग नमस्कार केला. दोघांमध्ये मूळ संवाद होऊन त्या तेज:पुंज व्यक्तीने श्रीधरांना शक्तिसंक्रमण केले. श्रीधरबुवांच्या डोळ्यातून अश्रुधारा वाहत होत्या. अंगावर रोमांच उभे राहिले होते. हा आत्मसाक्षात्कारच होता. ही घटना ‘श्रीधरस्वामी महाराज यांचे चरित्र’ या पुस्तकात श्री. मारुतीबुवा रामदासीनी लिहिली आहे. अशा एके दिवशी त्यांना दक्षिणेकडे जाण्याची आज्ञा समर्थांनी दिली. त्यानुसार श्रीधरबुवांनी समर्थांचा जयजयकार करीत दक्षिणेकडे प्रस्थान केले. गडावर असताना श्रीसमर्थांची पुण्यतिथी-दासनवमी उत्सवाची गोष्ट आहे. स्वामींना उत्सव विशाल, भव्य रितीने साजरा करायची इच्छा होती.
रघुवीर समर्थ रामनवमी विशेषाक अनुग्रहित होते. त्यांनी उत्सवाची तयारी सुरू केली. कर्नाटकातील भक्तांनी खूप देणगी पाठविली होती. बाहेरच्या गावाहून अनेक भक्तजन आले होते. सर्वांना सकाळी चहा, दूध, कॉफी, नाश्ता देण्याची व्यवस्था केली होती. दैनंदिन कार्यक्रमाची रूपरेखा ठरविली गेली. भजन, किर्तन प्रवचनाचे कार्यक्रम ठेवण्यात आले. भक्तांनी आक्काबाई मठीचा जिर्णोद्धार करून त्यांच्या समाधीवर एक सुंदर इमारत बांधली होती. त्या इमारतीचे उद्घाटन श्रीधर स्वामींच्या हस्ते झाले. त्यावेळी सातारा येथील कलेक्टर श्री. पाटील साहेब समारंभास उपस्थित होते. स्वामींनी ‘हिंदू धर्म व हिंदूंच्या वैभवशाली जीवनाचे मर्म’ या विषयावर बोधप्रद भाषण केले. दासनवमीचे नऊ दिवस धार्मिक कार्यक्रम तसेच समर्थ वाङ्मयावर प्रवचन, चिंतन, मननात गेले. सर्व मानकरी सेवक, मंडळींना नारळ देऊन निरोप घेतला.श्रीसमर्थ रामदास स्वामींचा जन्म होऊन साडेतीनशे वर्षे होत आले. त्या निमित्ताने समर्थांचा जन्मोत्सव संपूर्ण भारतभर साजरा व्हावा या उद्देशानी श्रीधरबुवा प्रयत्न करीत होते. वर्षा अगोदर त्यांनी या कार्यक्रमाचा प्रचार प्रसार करण्यात सुरुवात केली. त्रयोदशी मंत्राचा तेरा कोटी जप करून, यज्ञ करण्याचे ठरले. यज्ञाचे नेतृत्व श्री. गणेशशास्त्री खरे व दत्तभट महाबळेश्वर यांचे कडे होते. सर्व भारतातून समर्थ भक्तांनी जपाची संख्या आणून सज्जनगडावरच्या समाधीला वाहिली. श्रीसमर्थांचा जन्म हा रामनवमीच्या दिवशीचाच होता. श्रीसमर्थ जन्मोत्सव सुरू झाला. यागयज्ञादी कार्यक्रम झाले. श्रीधरस्वामी स्वतः उपस्थित राहून कार्यक्रमाची देखरेख करत होते. या कार्यक्रमासाठी महाराष्ट्रातून व महाराष्ट्राबाहेरून पन्नास वैदिक ब्राह्मण आले हो हे तेरा कोटीचे अनुष्ठान दोन वर्षात पूर्ण करायचे ठरले. पन्नास मंडळीनी यात भाग घ्यावा असा मानस होता. ही योजना श्रीधरकुटीत केली होती. या कार्यक्रमाचे नेतृत्व श्री. अण्णाबुवा कालगांवकर यांचेकडे सोपविले होते. श्रीधरबुवांनी तारकमंत्राचा उपदेश केला. त्यांना दोन वर्षाचा एकांत या निमित्ताने लाभणार होता. प्रत्येकजण स्नान संध्या करून येत असे. प्रत्येकाने तेरा सूर्यनमस्कार घालावेत असा दंडक होता. सामुदायिक नमः शांताय दिव्याय सत्यधर्मस्वरूपिणे। ध्यानाचे श्लोक सांगून झाले की अनुष्ठानास सुरुवात होई. अनुष्ठानास अधिक साधक यायला लागल्याने आठ महिन्यातच तेरा कोटीचा संकल्प पूर्ण झाला.
श्रीधरस्वामी सज्जनगडावर असताना त्याच्या अध्यक्षतेखाली एक भव्य कीर्तन संमेलन आयोजित करण्यात आले होते. महाराष्ट्र, कर्नाटक, गोमांतक, मध्यप्रदेश, गुजरात, आंध्रप्रदेशाहून जवळपास दोनशे कीर्तनकार जमा झाले होते. कार्यक्रम समर्थ समाधीच्या समोरच्या मंडपात ठेवण्यात आला होता. अध्यक्षस्थानी श्रीधरस्वामी विराजमान होते. श्रीधरांनी संमेलनाचे प्रयोजन काय ? कीर्तनाचे महत्त्व व परंपरा यावर लोकांना प्रबोधन केले. संमेलन तीन दिवस चालले. प्रत्येकाला अर्धा तासाचा वेळ देण्यात आला होता. नामवंत कीर्तनकार डॉ. विनायकबुवा पटवर्धन, मुरलीधरबुवा निजामपूरकर, रामचंद्रबुवा शिरवळकर, गोविंदस्वामी आफळे, मद्रासचे श्री. पंतलु इत्यादी लोक हजर होते. श्रीधर स्वामींनी प्रत्येक कीर्तनकारास जाण्यायेण्याचा खर्च व प्रत्येकी दोनशे रुपये मानधन म्हणून दिले. हा खर्च स्वतः स्वामीजींनी केला.
श्रीधरस्वामीनी सन १९५९ साल या चातुर्मास सज्जनगडावर केला होता. श्रीधरकुटीच्या माडीवर व्यवस्था केली होती. गडावरची व्यवस्था श्री. दिनकर बुवांकडे सोपविली होती. स्वामींच्या सेवेकरिता धारेश्वर येथील श्रीलक्ष्मीनारायण भट हा तरुण होता. स्वामींना एकांत मिळावा म्हणून दारावर पहारा देत असे. पौर्णिमेच्या दिवशी रात्री बारा वाजता स्वामीजींनी मौनव्रतयुक्त चातुर्मासाला सुरुवात केली. स्वामी एकांतात त्रिकाळ स्नान करीत व चिंतन, मनन करीत. पुण्याचे डॉ. ल. शं. भावे यांनी गाय देऊन दुधाची सोय केली होती. मुंबईचे श्री. शंकरराव उर्फ मामा काणे यांनी सतत चार महिने मुंबईहून फळांच्या करंड्या पाठविण्याचे काम केले. विजयादशमीच्या दिवशी श्रीधरस्वामींनी कुटीच्या एका भिंतीवर काव्य लिहिले. त्याच दिवशी सायंकाळी श्रीधर कुटीच्या गॅलरीत उभे राहून सर्वांना दर्शन दिले.श्रीधर स्वामींची सज्जनगड ही तपोभूमीच होती. दक्षिणेकडे जा, श्रृंगेरी जा, मुंबईला जा, सोलापूरला जा, कन्याकुमारीला जा. ते परत सज्जनगडावर येऊन समर्थांच्या सान्निध्यात राहात. त्यांना एकांत फार प्रिय होता. सज्जनगडाला दोन वर्षे एकांत, वरदपूरला पाच वर्षे एकांत, त्या एकांतात त्यांची समाधी लागे, त्याच्या जवळच्या शिष्याने एकांताबद्दल प्रश्न विचारल्यावर, स्वामींचे उत्तर होते. ‘सर्व कर्माचा’ त्याग करून सतत ब्रह्मास्थितीत असणे यालाच एकांत म्हणतात.’ महानिर्वाणापूर्वी श्रीधरस्वामी वरदपूरला एकांतात होते. तेथेच त्यांनी १९ एप्रिल १९७३ रोजी सकाळी देह ठेवला.
|| जय जय रघुवीर समर्थ ||