दशक पहिला : स्तवनाचा
समास पहिला : ग्रंथारंभलक्षण
॥ श्रीरामसमर्थ ॥
श्रोते पुसती कोण ग्रंथ । काय बोलिलें जी येथ । श्रवण केलियानें प्राप्त । काय आहे ।।१।।
‘काय बोलिले’ या शब्दांनी विषय व ‘प्राप्त काय आहे’ या शब्दांनी अनुबंधातील प्रयोजन (फळ) यांचा उल्लेख केला आहे. शास्त्राची भाषा न वापरता साधी भाषा वापरण्यास येथूनच सुरुवात झाली आहे.
ग्रंथा नाम दासबोध । गुरुशिष्यांचा संवाद । येथ बोलिला विशद । भक्तिमार्ग ||२||
स्वतःच्या प्रश्नाला स्वतःच उत्तर देताना समर्थ म्हणतात की, माझा हा दासबोध नावाचा ग्रंथ गुरु व शिष्य यांच्यातील कल्पित संवादरूपाने लिहिला असून त्यात भक्तिमार्गाचे सुस्पष्ट विवेचन आहे.
नवविधा भक्ति आणि ज्ञान । बोलिले वैराग्याचे लक्षण । बहुधा अध्यात्मनिरुपण । निरोपिले || ३ ||
भक्तीचे नऊ प्रकार, प्रपंच, ज्ञान व वैराग्य यांचा बराच विचार केला असला तरी प्रामुख्याने अध्यात्माचाच विचार व स्पष्टीकरण केले आहे.
भक्तिचेनि योगें देव । निश्चयें पावती मानव । ऐसा आहे अभिप्राव । इये ग्रंथीं ||४||
अधिकारसंपन्न होऊन भक्ती या साधनाने माणसाला ‘आत्मरूप देव मी आहे’ असा निश्चितपणे अनुभव येईल हे या ग्रंथाचे तात्पर्य आहे.
मुख्य भक्तीचा निश्चयो । शुद्ध ज्ञानाचा निश्चयो । आत्मस्थितीचा निश्चयो । बोलिला असे ।।५।।
आत्मनिवेदन या मुख्य भक्तीचे खरे स्वरूप, निर्विशेष व निर्विषय ज्ञान कसे असते व ज्याला हे ज्ञान झाले आहे त्याची अवस्था किंवा स्थिती कशी असते यांचे निश्चयात्मक वर्णन या ग्रंथात केले आहे.
शुद्ध उपदेशाचा निश्चयो । सायोज्यमुक्तीचा निश्चयो । मोक्षप्राप्तीचा निश्चयो । बोलिला असे ।। ६ ।।
‘जीव ब्रह्म आहे’ हाच शुद्ध उपदेश, जीवन्मुक्ती हीच खरी मुक्ती व मोक्ष म्हणजे नेमके काय यासंबंधी स्पष्टीकरण केले आहे.
शुद्ध स्वरूपाचा निर्धार । विदेह स्थितीचा निश्चयो | असहमतीचा अलिप्तपनाचा निश्चयो| बोलिला असे ।।७।।
ब्रह्म या विमल तत्त्वाचे स्वरूप, ब्रह्मज्ञान झाल्याने ‘मी देह आहे’ ही भूमिका जाऊन ‘मी देहाचा प्रकाशक आहे’ असा बोध झालेली अवस्था व आत्मरूप ‘मी’चा देह व दृश्य जगताशी असलेला कल्पित संबंध कमलपत्र व त्यावरील पाण्याप्रमाणे कसा असतो, याचे स्पष्ट विवेचन आहे.
मुख्य देवाचा निश्चयो । मुख्य भक्ताचा निश्चयो । जीवशिवाचा निश्चयो । बोलिला असे ।।८।।
ब्रह्मरूप देव, त्याच्याशी विभक्त नसलेला भक्त, ईश्वर व जीव यांचेसंबंधी निश्चयात्मक वर्णन केले आहे.
मुख्य ब्रह्माचा निश्चयो । नाना मतांचा निश्चयो । आपण कोण हा निश्चयो । बोलिला असे ।।९।।
चौदा ब्रह्मांपैकी खरे ब्रह्म कोणते, जीव, ईश्वर, जगत् व ब्रह्म यांच्या स्वरूपासंबंधी असलेला अनेक मतांचा ऊहापोह व ‘मी’चे खरे स्वरूप काय आहे याचे निर्णयात्मक वर्णन या ग्रंथात केलेले सापडेल.
मुख्य उपासनालक्षण । नाना कवित्वलक्षण । नाना चातुर्यलक्षण | बोलिलें असे ।।१०।।
उपासनेची मुख्य लक्षणे कोणती, काव्य किसी प्रकारांनी केले आते व चातुर्याची विविध लक्षणे कशी असतात त्यांचे वर्णन केले आहे.
मयोद्भवाचे लक्षण | पंच भुताचे लक्षण | कर्ता कोण हे लक्षण | बोलिलें ऐसें ।। ११ ||
‘माये’ या तत्त्वातून निर्माण झालेल्या दृश्य जगाचे वैशिष्ट्य, पाच महाभूतांचे रूप आणि खरा निर्माता कोण? यासंबंधी स्पष्टीकरण केले आहे.
नाना किंत निवारिले । नाना संशयो छेदीले | नाना आशंका फेडीले | नाना प्रश्न. || १२||
किंतु, संशय व आशंका या तीन शब्दांचा शंका हा एकच अर्थ आहे. व्यवहार, धर्म व परमार्थ यासंबंधी निर्माण होणारे प्रश्न व त्यासंबंधी निर्माण होणाऱ्या शंकांची उत्तरे दिली आहेत.
ऐसें बहुधा निरोपिलें । ग्रंथगर्भी जें बोलिलें । तें अवघें चि अनुवादलें। न वचे किं कदा ।। १३ ।।
ग्रंथाचे संपूर्ण अंतरंग प्रस्तावनेच्या मर्यादेत तपशीलाने सांगणे शक्य नाही. पण जे प्रामुख्याने सांगितले आहे. त्याचा उल्लेख केला आहे.
तथापि अवघा दासबोध । दशक फोडून केला विशद । जे जे दशकींचा अनुवाद। ते ते दशकीं बोलिला|| १४||
परंतु एवढे नक्की की दासबोधाची वीस दशकांत वाटणी केली असून, त्या त्या दशकात त्या त्या विषयांची मांडणी केली आहे. ती विस्तृत होईल अशी काळजी घेतली आहे.
नाना ग्रंथांच्या समती । उपनिषदे वेदांत श्रुती । आणि मुख्य आत्मप्रचीती । शाखेसहित ।।१५।।
दासबोधाची रचना करताना अनेक संबंधित ग्रंथांचा आधार घेतला असून, त्यात प्रत्येक वेदाच्या शेवटी येणाऱ्या
उपनिषदांचा किंवा श्रुतिवाक्यांचा मुख्यत्वाने समावेश आहे. शिवाय अन्य प्रकरण ग्रंथ व प्रक्रिया ग्रंथांचाही उपयोग
केला आहे. (उदा. विवेकचूडामणि, पंचदशी). श्रुती व शास्त्र याहून अधिक महत्त्वाचा म्हणजे स्वतःला आलेला पडताळा! त्याचाही दासबोधाच्या रचनेत महत्त्वाचा वाटा आहे.
नाना समतीअन्वये । म्हणौनि मिथ्या म्हणतां न ये । तथापि हें अनुभवासि ये । प्रत्यक्ष आतां ।। १६ ।।
या ग्रंथाला अशा प्रकारे अनेक प्रमाण ग्रंथांचा आधार असल्याने त्याच्याही प्रामाण्याविषयी शंका घेण्याचे कारण नाही. ग्रंथाचा यापुढे अभ्यास करणाऱ्याला तसा अनुभव येईलच.
मत्सरें यासी मिथ्या म्हणती । तरी अवघेचि ग्रंथ उछेदती । नाना ग्रंथांच्या समती । भगवद्वाक्यें ।। १७ ।।
अध्यात्मशास्त्राचा नवा ग्रंथ पुढे येत आहे म्हणून केवळ मत्सराने त्याला दोष द्यावयाचे असतील, तर त्यामुळे गीता, उपनिषदादी सर्वच ग्रंथांना दोष द्यावा लागेल व त्या सर्वांचेच प्रामाण्य नाकारावे लागेल.
शिवगीता राम गीता. गुरु गीता गर्भ गीता । उत्तर गीता अवधूत गीता. वेद आणि वेदांत || १८।।
भगवद्गीता ब्रह्मगीता हंसा गीता पांडव गीता । गणेश गीता येम गीता. उपनिषद भागवत.||१९||
इत्यादिक नाना ग्रंथ | समती बोलली येथ । भगवतवक्ये येथार्थ निश्चयेंसीं ।।२०।।
उत्तर गीता, अवधूत गीता, वेद, उपनिषद, भगवद्गीता, ब्रह्म गीता, हंस गीता, पांडव गीता, गणेश गीता, यम गीता, श्रीमत् भागवत इत्यादी अनेक ग्रंथांवर आधारित आहेत.
भगवद्वचनी अविश्वासे । ऐसा कवण पतित असे। भगवद्वाक्याविरहित नसे । बोलणें येथीचे ।। २१ । ।
प्रत्यक्ष भगवंताच्या उपदेशावर विश्वास न ठेवण्याइतका पापी कोणी असेल काय? या ग्रंथातील प्रत्येक सिद्धान्ताला भगवचनाचा प्रत्यक्ष आधार आहे. त्यावाचून एक शब्दही लिहिलेला नाही.
पूर्ण ग्रंथ पाहिल्याविण । उगाच ठेवी जो दूषण । तो दुरात्मा दुराभिमान । मत्सरें करी ।। २२ ।।
संपूर्ण ग्रंथाचा व्यवस्थित अभ्यास केल्याशिवाय जर कोणी त्या ग्रंथाला नावे ठेवीत असेल, तर तो दुष्ट व दुरभिमानी केवळ मत्सरामुळेच तसे करील.
अभिमानें उठे मत्सर । मत्सरें ये तिरस्कार । पुढें क्रोधाचा विकार । प्रबळे बळें ।। २३ ।।
दुरभिमानामुळे मत्सर उफाळून येतो. मत्सराचे रूपांतर तिरस्कारात होते व तिरस्कारातून क्रोधाचा अग्नी पेटतो.
ऐसा अंतरीं नासला । कामक्रोधें खवळला । अहंभावें पालटला । प्रत्यक्ष दिसे ।। २४ ।।
असा जो कोणी कामक्रोधादिकांनी खवळून नासक्या अन्तःकरणाचा होतो त्याच्या अहं वृत्तीमध्ये झालेला भयंकर बदल सर्वांनाच स्पष्टपणे दिसतो.
काम क्रोधे लिथाडिला | तो कैसा मन्हवा भला | अमृत सेविताच पावला | मृत्यु राहो ||२५||
जो कामक्रोधादिकांनी बरबटलेला आहे त्याला सज्जन कसे म्हणता येईल? त्याची अवस्था अमृत पिऊ बघणाऱ्या राहूसारखी होईल, श्रीविष्णू मोहिनीच्या रूपाने देवांना अमृत वाटत असताना, राहू कपटाने देवांच्या रांगेत बसला. तो अमृताचा घोट घेणार तोच चंद्र व सूर्याने राहूचे कपट विष्णूच्या लक्षात आणून दिल्याने श्री विष्णूंनी क्षणार्धात त्याचे मस्तक सुदर्शन चक्राने उडवले. अमृत मुखातच राहिले. जठरात गेले नाही. ही गोष्ट समुद्रमंथनाच्या वेळेची आहे. त्याप्रमाणे हा ग्रंथ वर वर पाहून त्याला नावे ठेवणाऱ्यांना या अमृततुल्य ग्रंथाच्या लाभाला मुकावे लागेल.
आतां असो हें बोलणें । अधिकारासारिखें घेणें । परंतु अभिमान त्यागणें । हें उत्तमोत्तम ।। २६ ।।
खरे तर एवढे बोलू नये. पण ज्याचा जसा अधिकार असेल तसा त्याला लाभ होईल. तरीही दुरभिमान सोडण्यातच जीवाचे खरे कल्याण आहे.
मागा श्रोती आक्षेपीले | जी ये ग्रंथी काय बोलिलें । सकलही निरोपीले | संकलित मार्गे || २७||
सुरुवातीला या ग्रंथासंबंधी जो प्रश्न श्रोत्यांनी विचारला होता त्याचे पूर्ण उत्तर थोडक्यात दिले आहे.
आतां श्रवण केलियाचें फळ । क्रिया पालटे तत्काळ । तुटे संशयाचें मूळ । येकसरां ।। २८ ।।
या ग्रंथाचे व्यवस्थित श्रवण केले असता श्रवण करणाऱ्याच्या प्रवृत्तीत ताबडतोब बदल होईल. त्याचे वागणे, बोलणे बदलून जाईल. त्याच्या मनात असलेल्या अनेक शंकांची उत्तरे मिळत जातील. अज्ञान हे शंकेचे मूळ आहे. ग्रंथाचे खरे मनन आणि चिंतन केल्याने अज्ञान नष्ट होईल.
सापडे सुगम | न लगे साधन दुर्गम | सायोज्य मुक्तीचे वर्म | टाही पडे || २९||
जीवन्मुक्तीचा सोपा मार्ग त्याला दिसू लागेल. अवघड साधने करण्याची गरज नाही हे लक्षात येईल व सायुज्य मुक्ती किंवा जीवन्मुक्ती म्हणजे नक्की काय हे कळेल.
नासे अज्ञान दुःख भ्रांती । शीघ्रचि येथें ज्ञानप्राप्ती । ऐसी आहे फळश्रुती । ईये ग्रंथीं ।। ३० ।।
‘मी’, दृश्यजगत्, जगताचे कारण ब्रह्म, जगताथा नियंता ईसर यासंबंधीचे अज्ञान दूर होईल, दुःखाचे स्वरूप कळून दुःखांची कारणे प्रारब्धामुळे तशीच राहिली, तरी त्यामुळे दुःख होणार नाही. पाच प्रकारचे अम नष्ट होऊन
लवकरच ‘मी ब्रह्म आहे’ असे ज्ञान होईल. पाच प्रकारचे अस पुढीलप्रमाणे- १) जगत्सत्यत्वभ्रान्ती- सोन्याऐवजी विशिष्ट नाम व रूप असलेली बांगडी दिसू लागली की, सोन्याकडे दुर्लक्ष
होते. त्याप्रमाणे नामरूपांनी भरलेले जग सत्य वाटू लागले की ब्रह्माकडे दुर्लक्ष होते. जग खरे आहे असा भ्रम होतो, २) कर्तृत्वभोक्तृत्वभ्रान्ती- जास्वंदीच्या पाकळीवर पारदर्शक पेपरनेट ठेवला तर त्या पाकळीने पेपरवेट रंगीत केल्यासारखे वाटते. त्याप्रमाणे निष्क्रीय आल्याच्या सतेवर बुद्धीचे व्यवहार चालत असले, तरी आत्माच कर्ता आहे. असा भ्रम होतो.
३) भेदभ्रान्ती- सूर्यविवांचे पाण्यामुळे पाण्यात प्रतिबिंब दिसून सूर्याने प्रतिबिंब असे दोन भेद भासतात.. त्याप्रमाणे आत्मबिंबाचे स्वच्छ बुद्धीत आभासरूप प्रतिविव पडल्याने आत्मा व जीव असा भेदाचा भ्रम होतो. ४) संगप्रान्ती- पटातील आकाशाचा पटाशी कधीच संग का संबंध होत नाही. घट फुटला तरी आकाश जसेच्या तसे राहते. त्याप्रमाणे आत्मा व शरीर यांचा कधीच संग होत नाही. देह मरण पावताच आत्मा मेला असा अज्ञानामुळे भ्रम होतो. (५) विकारभ्रान्ती- असतो, जन्मतो, वाढतो. बदलतो, क्षीण होतो व नष्ट होती है सहा विकार देहाला असतात. अज, अजर, अमर व निरवयव आत्म्याला विकार नसतात. देहाचे विकार आत्म्याने आहेत. असा भ्रम होतो. असे भ्रमज्ञान नष्ट झाल्यावर आत्मज्ञान होते.
योगियांचे परम भाग्य । आंगीं बाणें तें वैराग्य । चातुर्य कळे यथायोग्य । विवेकेंसहित ||३१||
ज्याला जीव व ब्रह्म यांचा योग साधावयाचा आहे त्याला वैराग्य प्राप्त झालेच पाहिजे. असे वैराग्य हे महत् भाग्याचे लक्षण आहे. हे वैराग्य या ग्रंथाच्या अभ्यासाने मिळेल. व्यवहारचातुर्य व ब्रह्मसत्य असून व्यवहाराचा आधार असलेले जग मिथ्या आहे हा विवेक होईल.
भ्रांत अवगुणी अवलक्षण । तेचि होती सुलक्षण । धूर्त तार्किक विचक्षण । समयो जाणती ।। ३२ ।।
कर्म-अकर्म, नीती-अनीती इत्यादीसंबंधी असलेले भ्रम जातील. दुर्गुण व कुलक्षणे हळूहळू कमी होतील व त्यांची जागा सद्गुण व सुलक्षणे घेतील. प्रसंग, व्यवहार व व्यक्ती यांचे आकलन होईल. तर्कशक्ती काम करू लागेल. बुद्धीला निवाडा करण्याचे सामर्थ्य येईल. कालमानाच्या प्रभावाचे भान राहील. पुढे कोणती वेळ येऊन ठेपणार आहे त्याचे आधीच आकलन होईल. समोर ठाकलेल्या प्रसंगाचे स्वरूप लक्षात येईल.
आळसी तेचि साक्षपी होती । पापी तेचि प्रस्तावती । निंदक तेचि वंदूं लागती । भक्तिमार्गासी ।। ३३ ।।
जे आळशी आहेत त्यांना उद्योग करावासा वाटेल. पापी लोकांना आपल्या पापी जीवनाचा पञ्चात्ताप होईल. ‘भक्ती ही निरुद्योगी, निराश व भावनाप्रधान मंडळींची अनुत्पादक जीवनपद्धती आहे’ या व अशा प्रकारची भक्तीची निंदा करणारे भक्तिमार्गाचे महत्त्व ओळखतील.
बद्धाची होती मुमुक्षु । मूर्ख होती अती दक्ष | अभक्तिच पावती मोक्ष | भक्तिमार्गे ||३४||
जे बद्ध आहेत (द. ५ स. ७) ते मुमुक्षु होतील (द. ५ स. ८) मूर्ख आपला मूर्खपणा सोडून तो न करण्याविषयी जागरूक राहतील, (द. २ स. १) जे भगवत् भजन करीत नाहीत ते, भगवंताचे भजन करूनच मुक्त होतील.
नाना दोष ते नासती | पतित तेचि पावन होती | प्राणी पावे उत्तम गती | श्रवणमात्रे ||३५||
स्वभाव, आचार, विचार व उच्चार यांतील अनेक प्रकारचे दोष नाहीसे होत जातील, या दोषांमुळे पतित झालेले पावन होत जातील. व्यावहारिक पतन थांबेल. ‘मी’ ब्रह्म असताना ‘मी देहादी आहे’ अशा अज्ञानाने पतन पावलेले, ‘मी ब्रह्म आहे’ असा अनुभव घेऊन ब्रह्माप्रमाणे पावन (विमल) होतील. या ग्रंथाच्या श्रवणाने माणसाला अशी उत्तम गती मिळेल. जीवभावाची अधोगती थांबून ब्रह्मभावाची उत्तम गती प्राप्त होईल.
नाना धोके देह बुद्धीचे | नाना किंत् सन्धेहाचे | नाना उद्वे ग संसाराचे | नासती श्रवणे || ३६||
‘मी देह आहे’ या देहबुद्धीमुळे जीवाला अनेक दुःखे, यातना, संकटे व छळ सोसावे लागतात. ते श्रवणामुळे जाणवणार नाहीत, व्यवहार व परमार्थ याविषयी असलेल्या अनेक शंका व चुकीच्या संकल्पना नाहीशा होतील. या जगात व प्रपंचात राहून जीवन जगत असताना होणारे उद्वेग नष्ट होतील.
ऐसें याची फलश्रुति | श्रव्णे चुके अधोगती | मनास होय विश्रांती | समाधान || ३७||
असे या ग्रंथाच्या श्रवणाचे फळ आहे. त्यामुळे अधोगती टळून अन्तःकरण शांत व तृप्त होते.
जयाचा भावार्थ जैसा । तयास लाभ तैसा । मत्सर धरी जो पुंसा । तयास तेंचि प्राप्त ।। ३८ ।।
परंतु त्यासाठी ग्रंथ व ग्रंथातील विषयावर श्रद्धा हवी. जेवढी श्रद्धा जास्त तेवढे फळ अधिक. ग्रंथकर्त्या व्यक्तीकडे लक्ष देऊन व्यक्तिमत्सरामुळे ग्रंथमत्सर केला, तर त्या मत्सरी व्यक्तीला तसेच फळ मिळेल.
इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे ‘ग्रंथरंभलक्षणनाम समास’ या पहिल्या गुरुशिष्यसंवादात्माका श्रीदासबोधे किंवा ‘ग्रंथरंभलक्षणम्’चा पहिला संयुग पूर्ण झाला.
|| जय जय रघुवीर समर्थ ||